मध्य पूर्व संकटात अडकलेल्या भारतीयांच्या विमान तिकीटाचा खर्च सरकारने उचलावा, आमदार रईस शेख यांची मागणी
नफिसा गिरकर - मध्य पूर्वेतील संकटामुळे परदेशात अडकलेल्या प्रामाणिक भारतीय करदात्यांच्या परतण्याच्या विमान तिकीटाचा खर्च केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार किंवा भारतीय दूतावासांनी उचलावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. २८ फेब्रुवारी पासून अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे इराण, इराक, कतार, यूएई, सौदी अरेबिया यासह अनेक देशांनी हवाई क्षेत्र बंद केले. यामुळे गेल्या काही दिवसांत ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाली असून, गल्फ आणि ट्रांझिट ठिकाणी हजारो भारतीय अडकले आहेत. भारतीय प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण भाडे + १८% जीएसटी भरून तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना आता दुसऱ्या एअरलाइन्सकडून मूळ किंमतीच्या ३ ते ५ पट जास्त दराने नवीन तिकीट घ्यावे लागत आहे. “हे नागरिक दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरतात. सरकारला हा महसूल मिळतो. संकटात त्यांना सुरक्षित घरी आणणे ही सरकारची जबाबदारी आहे. करदात्यांना पुन्हा महागडी विमान तिकीटे का भरावी लागतात?” असे आमदार रईस शेख यांनी विचारले.त्यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून विशेष चार्टर उड्डाणे किंवा परतण्याच्...