पोस्ट्स

बांग्लादेशी एबी बँकेकडून कर्करोग उपचार व संशोधनासाठी ४० लाखांची मदत

इमेज
— भारत-बांग्लादेश आरोग्य सहकार्याला चालना नफिसा गिरकर -  मुंबई : बांग्लादेशच्या मुंबईतील उप-उच्चायुक्त फरहाना चौधरी यांच्या उपस्थितीत एबी बँक पीएलसी, मुंबई शाखेकडून कर्करोग उपचार व संशोधनासाठी ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. हा निधी टाटा मेमोरियल सेंटरअंतर्गत नवी मुंबईतील ‘अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर’ (ACTREC) यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आला. एबी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दरायूस बजान व वरिष्ठ उपाध्यक्ष मोहम्मद अबुल कलाम आझाद यांनी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. या निधीतून अत्याधुनिक संशोधन उपकरणांची खरेदी, कर्करोगावरील आण्विक व ट्रान्सलेशनल संशोधनाला चालना, तसेच निदान व उपचारांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. यावेळी डॉ. सुदीप गुप्ता यांनी टाटा मेमोरियल सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार सुविधांची माहिती दिली. नवी मुंबईतील ACTREC केंद्रात प्रोटॉन थेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, तुलनेन...

समाजवादीच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी शब्बीर खान यांची नियुक्ती

इमेज
नफिसा गिरकर : लोकमानस - मुंब्रा : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी शब्बीर अहमद सिराजुद्दीन खान यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या हस्ते शब्बीर खान यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते फरहान आझमी देखील उपस्थित होते. या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास समाजवादी पक्षाने व्यक्त केला आहे. शब्बीर खान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची कामगिरी अधिक प्रभावी होऊन सर्वसामान्य जनतेची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, असेही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. पक्ष कार्यकर्त्यांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून आगामी काळात संघटनात्मक बळकटीसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक स्तरावर पक्षाची पकड वाढवून जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले. दरम्यान, पक्षाने आपल्या वर दाखवलेल्या विश्वासाला पूर्ण न्याय देत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा निर्धार शब्बीर खान यांनी व्यक्त क...

भारत हा केवळ शेजारी देश नसून विश्वासू मित्र- फरहाना चौधरी- बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन व राष्ट्रीय दिन उत्साहात साजरा

इमेज
नफिसा गिरकर : (मुंबई) - भारत हा बांगलादेशाचा केवळ शेजारी देश नसून विश्वासू मित्र आहे. दोन्ही देशांमध्ये सुमारे ४००० किमी सीमा असून दोन्ही देशातील परस्पर संबंध तळागाळापर्यंत पोहोचले आहेत, असे बांगलादेशच्या मुंबईतील उप-उच्चायुक्त फरहाना चौधरी म्हणाल्या. बांगलादेशचा स्वातंत्र्याचा ५५ वा वर्धापनदिन नुकताच मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य सरकारचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  फरहाना चौधरी म्हणाल्या, हा दिवस केवळ राष्ट्रनिर्मितीचा नसून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांचे स्मरण करण्याचा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. २०२४-२५ या कालावधीत दोन्ही देशांतील व्यापार सुमारे १२ बिलियन यूएस डॉलर्सपर्यंत पोहोचल्याची माहिती देत, द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित नेतृत्व आणि विश्वासू भागीदारीचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे वि...

आ.निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत मांडले ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न ; पदोन्नती कालावधी कमी करण्यासह अनुकंपा नियुक्त्यांबाबत शासनाची सकारात्मक भूमिका

इमेज
नफिसा गिरकर -  महाराष्ट्र विधानपरिषदेत मंगळवारी म.वि.प. नियम ९७ अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न तसेच अनुकंपा तत्वावरील प्रलंबित नियुक्त्यांचा अत्यंत महत्त्वाचा व कर्मचारी हिताशी संबंधित मुद्दा प्रभावीपणे सभागृहात मांडला. चर्चेदरम्यान आ.  ॲड. निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या ६ जून २०१७ च्या अधिसूचनेनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा कालावधी ३ वर्षे असताना ठाणे महानगरपालिकेत तो ५ वर्षे ठेवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. नवी मुंबई व अकोला महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही हा कालावधी तातडीने ३ वर्षे करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अनुकंपा तत्वावरील अनेक नियुक्त्या प्रलंबित राहिल्या असून संबंधित वारसांना न्याय मिळण्यात विलंब होत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. काही प्रभावित कुटुंबांनी तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिल...

वरळीत गुढीपाडव्याचा सांस्कृतिक जल्लोष; भव्य शोभायात्रा आणि ‘मराठी शाळा’ रील स्पर्धा आकर्षण

नफिसा गिरकर -  हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक उत्साहात आणि मराठमोळ्या थाटात करण्यासाठी वरळी परिसरात भव्य गुढीपाडवा शोभायात्रा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसह्याद्री फाउंडेशन आणि ‘आम्ही वरळीकर’ या संकल्पनेतून आयोजित या शोभायात्रेचे यंदा सोळावे वर्ष असून ती अधिक भव्य आणि आकर्षक करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील सामाजिक संस्था, मंडळे, ट्रस्ट, सर्व राजकीय संघटना तसेच नागरिकांनी सहकुटुंब या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही शोभायात्रा गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता जांबोरी मैदान, डॉ. जी. एम. भोसले मार्ग, वरळी येथून प्रारंभ होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते गुढी उभी करून,विश्वशांती प्रार्थना व शालेय विद्यार्थ्यांच्या सामूहिक महाराष्ट्र गीतांनी शोभायात्रेची सुरुवात होणार असून पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, जव्हार येथिल तारफा नृत्य,आकर्षक गुढ्या आणि विविध सांस्कृतिक देखावे यामुळे वातावरण उत्साहाने भारावून जाणार आहे. याशिवाय ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य चित्ररथ, बाईक रॅली, साई पालखी सोहळ्याची मिरवणूक, वारकरी...

एलपीजी संकट आणि परराष्ट्र धोरणावर अखिलेश यादव यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

इमेज
नफिसा गिरकर - मुंबई :  समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एलपीजी गॅस संकट तसेच देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. आज देशात एलपीजी ही ‘लापता गॅस’ बनली आहे,अशी टीका त्यांनी केली.मुंबई दौऱ्यावर आलेले अखिलेश यादव शनिवारी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आसिम आझमी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते.  या कार्यक्रमाला शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजी आमदार युसुफ अब्राहनी, कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, एलपीजी आणि ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न थेट देशाच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे. भारत खरोखरच “विश्वगुरू” बनत असेल तर त्याने युद्धाच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन शांततेचा संदेश दिला पाहिजे. सरकारने या विषयावर आधीच स्पष्ट भूमिका घेतली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असेही त्यांनी नमूद केले. युद्धामुळे केवळ लोकांचे जीव गेले नाहीत, तर त्याचा परिणाम सामान्य जनतेवरही होत आहे. एलपीजीच्या टंचाईमुळ...

मुंब्रा कौसा येथील भाजपच्या इफ्तार कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

इमेज
नफिसा गिरकर (कौसा ) : पवित्र रमजान महिन्यानिमित्त भाजप ठाणे  जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा आणि कौसा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला विविध राजकीय पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले,  ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह विक्रम भोईर, सुमीत भोईर,संजय वाघुले, मृणाल पेंडसे, योगेश भोईर, कुणाल पाटील, सचिन केदारी, वीर सिंग प्राचा यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वृषाली वाघुळे, नताशा सोनकर, रुक्सना शेख, सलीमा पटेल आदींनीही उपस्थिती लावली. या इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा अल्पसंख्यक मोर्चाचे अध्यक्ष शरीफ शेख आणि कौसा मंडळाच्या अध्यक्षा नाझिया हारून तांबोळी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा संदेश दिला.  सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आयो...

घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कमतरता नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये – प्रशासनाचे आवाहन

नफिसा गिरकर (मुंब्रा) :  पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती व समुद्री मार्गावरील अडथळ्यांमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात तात्पुरती अडचण निर्माण झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या साठ्यात कोणतीही कमतरता नाही व गॅससिलेंडरचा पुरवठा सुरळीत चालू आहे अशी माहिती मुंब्रा येथील शिधा वाटप अधिकारी रोहित माळकर यांनी दिली.  नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच  सिलेंडरची अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  घरगुती एलपीजी ग्राहकांना काही समस्या उद्भवल्यास त्यासाठी उपनियंत्रक,शिधावाटप  फ परिमंडळ यांच्या कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी काही तक्रार असल्यास 8169230665 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे. मुंब्रा येथील तक्रारींबाबत संपर्क साधण्यासाठी खालील क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रावसाहेब लेले  - 9702839293 सुनिल आवारे   - 9987422766

टोरेंट पॉवरच्या दावत-ए-इफ्तारला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
नफिसा गिरकर (मुंब्रा) : पवित्र रमजान महिन्यानिमित्त सामाजिक एकता आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी टोरेंट पॉवर कंपनीतर्फे दावत-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते.  शीळ- मुंब्रा कौसा परिसरातील नागरिकांसाठी कौसा येथील डायमंड बँक्वेट हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या इफ्तार कार्यक्रमाला शहरातील सुमारे ३०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. विविध पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, प्रमुख राजकीय व्यक्ती, विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमजानच्या पवित्र वातावरणात सर्व समाजघटक एकत्र आल्याने कार्यक्रमात सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी टोरेंट पॉवर कंपनीच्या वतीने उपाध्यक्ष जीवन क्लार्क, महाव्यवस्थापक जय पंड्या, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी, चीफ ऑफ सेक्युरिटी ब्रिगेडियर विनय बहल तसेच पीआरओ शशिकांत कोठेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे जिव्हाळ्याने स्वागत केले. पाहुण्यांसाठी इफ्तारची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान हाफिज रोशिक रझ...

स्टंट कराल तर तुरुंगात जाल, दुचाकी स्टंटबाजांविरोधात मुंब्रा पोलिस व वाहतूक पोलिस आक्रमक

नफिसा गिरकर  : मुंब्रा–कौसा परिसरात  रस्त्यांवर बाईकवर धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात मुंब्रा पोलिस व वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे.  मित्तल ग्राउंड व एमएम व्हॅली रोड परिसरात काही युवकांकडून वेगाने बाईक चालवणे तसेच स्टंट करण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पोलिसांनी असे प्रकार रोखण्यासाठी कारवाई सुरु केली आहे.   गेल्या काही दिवसांत या स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमध्ये काही युवक सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करताना दिसत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई सुरू केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान सात बाईक जप्त करण्यात आल्या असून पुढील काळातही अशा रॅश ड्...

मुंब्रामध्ये एमआयएम अधिक सशक्त करणार- वारीस पठाण, एमआयएमची इफ्तार पार्टी संपन्न

इमेज
नफिसा गिरकर :  मुंब्रा कौसामध्ये एम आय एम पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत, आगामी काळात पार्टी पक्ष अधिक सशक्त होईल व आणखी जास्त नगरसेवक निवडून येतील व जनतेच्या समस्या सोडवून विविध विकास कामे करतील, असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी आमदार अँड. वारिस पठाण यांनी व्यक्त केला. रमजान निमित्त एमआयएम पक्षातर्फे मुंब्रा मध्ये इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या इफ्तार कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. त्यावेळी वारिस पठाण बोलत होते. ठाणे महापालिकेतील एमआयएम चे गट नेते सैफ पठाण यांच्यातर्फे या इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार कार्यक्रमाला करीम खान, एमआयएमचे नवनिर्वाचित नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एम आय एम ला मुंब्रा कौसा मध्ये पाच जागांवर विजय मिळवल्याने पक्षातर्फे मुंब्रा कौसा विभागावर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. पक्षाला अधिक सशक्त करून पक्ष मजबूत केला जाईल, असे वारीस पठाण यांनी सांगितले.  देशात व जगात ...

हाजी अली दर्गाह येथे ‘देसी सेहरी’ उत्साहात संपन्न

इमेज
लोकमानस प्रतिनिधी मुंबई : हाजी अली दर्गाह येथे शनिवारी रात्री पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक ‘देसी सेहरी’ कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभागी होत रमजानच्या पवित्र परंपरेचा आणि एकतेच्या संदेशाचा अनुभव घेतला. हा कार्यक्रम माहीम आणि हाजी अली दरगाहचे व्यवस्थापकीय विश्वस्त सोहेल खंडवानी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करत रमजान महिन्याच्या माध्यमातून समाजात एकता, कृतज्ञता आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याच्या परंपरांचे महत्त्व अधोरेखित केले. अरबी समुद्राच्या मध्यभागी एका छोट्या बेटावरील हाजी अली दर्गाह ही मुंबईतील अत्यंत ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान मानली जाते. या पवित्र स्थळाला दरवर्षी अंदाजे दोन कोटींहून अधिक भाविक आणि पर्यटक भेट देतात. त्यामुळे हाजी अली आणि माहीम दर्गाह ही मुंबईसह देशातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक स्थळांपैकी एक मान...

मुंब्रा येथे गोळीबार, एका तासात आरोपीला अटक, अटक करताना आरोपीचा पोलिसांवर गोळीबार

नफिसा गिरकर  : कौसा परिसरातील अरमान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील नदीम खान यांच्या वाहनावर शनिवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. गोळीबाराची घटना घडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र मुंब्रा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने पोलिस पथकावर गोळीबार केला. त्यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्या.   जखमींमध्ये रहीम रियाज सय्यद व फारुख अब्दुल अहमद शेख यांचा समावेश आहे.  फारुकला पोटावर किरकोळ जखम आणि रहीम ला डाव्या हाताच्या बोटावर जखम झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. त्यांना उपचारासाठी काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा  आरोपीने पोलिसांना पाहताच पाच गोळ्या झाडल्या.नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलिस अधिकाऱ्यांनी  गोळीबार केला नाही. मात्र पोलिसांनी धाडसी कारवाई करत आरोपीला फायरिंगमध्ये वापरलेल्या शस्त्रासह ताब्यात घेतले असून त्याच्याकडे या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.  ७ मार्च  रोजी पहा...

मुसन्ना मिया यांचा वार्षिक ऊर्स संपन्न, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती

इमेज
मुंबई - हजरत मुसन्ना मिया यांचा वार्षिक ऊर्स गुरुवारी मध्यरात्री भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या ऊर्ससाठी मुंबई, ठाणे तसेच परिसरातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.  ऊर्स निमित्त मुसन्ना मिया यांचे उत्तराधिकारी तसेच ऑल इंडिया जमैतुल उलेमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद  मोईनुद्दीन अश्रफ (मोईन मिया) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन छोटा सोनापूर येथे करण्यात आले होते. यावेळी मोईन मिया यांनी सामूहिक दुआ केली. समाजात शांतता, सलोखा आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, आमदार मनोज जामसूतकर, माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख,माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी आमदार जीशान सिद्दीकी, माजी राज्य मंत्री शिवसेना उबाठाचे आमदार सचिन अहिर, काँग्रेस विधिमंडळ उपनेते आमदार अमिन पटेल,  अल्पसंख्याक ...

मध्य पूर्व संकटात अडकलेल्या भारतीयांच्या विमान तिकीटाचा खर्च सरकारने उचलावा, आमदार रईस शेख यांची मागणी

इमेज
नफिसा गिरकर - मध्य पूर्वेतील  संकटामुळे परदेशात अडकलेल्या प्रामाणिक भारतीय करदात्यांच्या परतण्याच्या विमान तिकीटाचा खर्च केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार किंवा भारतीय दूतावासांनी उचलावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. २८ फेब्रुवारी पासून अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे इराण, इराक, कतार, यूएई, सौदी अरेबिया यासह अनेक देशांनी हवाई क्षेत्र बंद केले. यामुळे गेल्या काही दिवसांत ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाली असून, गल्फ आणि ट्रांझिट ठिकाणी हजारो भारतीय अडकले आहेत. भारतीय प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण भाडे + १८% जीएसटी भरून तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना आता दुसऱ्या एअरलाइन्सकडून मूळ किंमतीच्या ३ ते ५ पट जास्त दराने नवीन तिकीट घ्यावे लागत आहे. “हे नागरिक दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरतात. सरकारला हा महसूल मिळतो. संकटात त्यांना सुरक्षित घरी आणणे ही सरकारची जबाबदारी आहे. करदात्यांना पुन्हा महागडी विमान तिकीटे का भरावी लागतात?” असे आमदार रईस शेख यांनी विचारले.त्यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून विशेष चार्टर उड्डाणे किंवा परतण्याच्...

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

इमेज
नफिसा गिरकर :  राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवारी संपत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यसभेसाठी इच्छुक दिग्गज उमेदवारांना डावलून नव्या नेतृत्वाला राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून काम करणाऱ्या शिवसेनेचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळख निर्माण केलेल्या प्राध्यापक डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. डॉ.वाघमारे या सोलापूर जिल्ह्यातील असून मागील पंधरा वर्षांपासून सामाजिक आणि आर्थिक राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहेत.  शिवसेनेतून राज्यसभेवर जाण्यासाठी माजी खासदार राहुल शेवाळे, प्रवक्त्या शायना एन सी,  माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ,माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. मात्र, या सर्वांना बाजूला सारत एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.  शिवसेनेतील उठावानंतर ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत एप्रिल 2023 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या त्यांच्या...

महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित, काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर

इमेज
नफिसा गिरकर - मुंबई : राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड झाली असून महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उमेदवारीला काँग्रेस पक्षाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.   काँग्रेसचे  प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.  महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती सपकाळ यांनी दिली. मुंबईतील गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुले यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकीस काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते.   ...

विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक संपन्न, पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नफिसा गिरकर  - मुंबई  : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना आणि स्वारगेट बसस्थानकावरील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली.  स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यातील २४२ ठिकाणी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमधील शिफारशी तातडीने आणि निश्चित कालमर्यादेत अंमलात आणाव्यात, असे स्पष्ट निर्देश  डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिले. बस स्थानके, रेल्वे स्थानके व सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था, महिला पोलिसांची गस्त, हेल्पलाईन, पॅनिक बटण, स्वच्छतागृहे, तक्रार नोंदणी प्रणाली आणि ‘हिरकणी कक्ष’ यांची स्थिती तपासण्यात आली. अनेक सुविधा अस्तित्वात असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. विशेषतः पॅनिक बटण प्रणाली कार्यक्षम नसल्याचे आढळल्याने ती नियंत्रण कक्षाशी तसेच व्हॉट्सअ‍ॅप क्रमांका...

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब

इमेज
   नफीसा गिरकर-  राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील चार नावांची घोषणा केली. पक्षाने यामध्ये धक्का तंत्राचा वापर केल्याचे दिसून आले.राज्यसभेच्या उमेदवारी बाबत कोणत्याही चर्चेत नसलेल्या दोन नावांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. तर त्यापैकी दोन नावे चर्चेतील आहेत. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील विद्यमान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना देखील खासदारकीचे तिकीट दिले आहे. या यादीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. भाजपच्या चार जागांसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होती राज्यसभेतून निवृत्त होत असलेले धैर्यशील पाटील व भागवत कराड हे सदस्य व माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे, यांच्यासह अनेकांची नावे राज्यसभेसाठी चर...

मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील डोंगरावरील जंगलामध्ये आग

इमेज
नफिसा गिरकर :  मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरच्या डोंगरावरील जंगलात मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग डोंगराच्या उंच भागात लागल्याने पाण्याचा मारा करणे शक्य होईल का याबाबत साशंकता आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. परिस्थिती लक्षात घेऊन याबाबतची माहिती  अग्निशमन दल व वनविभागाला देण्यात आली आहे. या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही आग लागली की कुणी जाणिवपूर्वक लावली , अशी चर्चा केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब्रादेवी मंदिरामागे डोंगरावर आग लागली होती.  तेव्हा देखील उंच भागात आग लागल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा करणे अशक्य झाले होते.  तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणी समाजकंटकाने जाणिवपूर्वक लावली याचा तपास होणे आवश्यक आहे.

भारतीय नौदलाचे शिडाचे जहाज आयएनएसव्ही कौंडिण्यचे स्वागत

इमेज
नफिसा गिरकर : पारंपरिक पद्धतीने बांधलेली भारतीय नौदलाची नौका ओमानमधील मस्कत येथून आपला पहिला ऐतिहासिक परदेश प्रवास करुन परतली आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी मुंबईतील नौदलाच्या तळावर भारतीय नौदलाचे शिडाचे जहाज आयएनएसव्ही कौंडिण्यचे स्वागत केले.  याप्रसंगी बोलताना संरक्षण राज्यमंत्र्यांनी या मोहिमेचे  राष्ट्रीय महत्त्व समजावून सांगितले. आयएनएसव्ही कौंडिण्यने   भारताच्या प्राचीन सागरी ज्ञान प्रणालीच्या  पुनरुत्थानाचे प्रतीक  आहे आणि ते देशातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले. या प्रवासातून प्रतिबिंबित झालेले धाडस, चिकाटी  आणि शोधक वृत्ती अधोरेखित करुन त्यांनी युवा भारतीयांना आपल्या सांस्कृतिक आत्मविश्वासावर आधारलेल्या  साहस व नवोन्मेषासाठी प्रोत्साहन दिले. संजय सेठ यांनी युवा पिढीला आपल्या सांस्कृतिक आत्मविश्वासावर आधारलेल्या साहस व नवोन्मेषाचा पाठपुरावा करण्यासाठी  प्रोत्साहन दिले. अरबी समुद्रात पारंपरिक नौकेतून केलेल्या प्रवासादरम्यान या नौकेवरील कर्मचाऱ्यांनी दर्शवलेल्या समर्पित व व्यावसायिक वृत्तीचे...