पोस्ट्स

दिवा रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करा - दिवा शहर नागरी हक्क समितीची मागणी

इमेज
नफिसा गिरकर - दिवा : दिवा रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी दिवा शहर नागरी हक्क समितीच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीकडे करण्यात आली आहे. दिवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले रस्ते अडवून बसत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास गंभीर अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असून आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका तसेच सार्वजनिक वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाकडे संबंधित परिसर फेरीवाला मुक्त विभाग  घोषित करण्याचा अधिकार असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. परिणामी नियमांचे उघड उल्लंघन सुरू असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. समितीच्या प्रमुख मागण्या: दिवा रेल्वे स्थानक परिसर तात्काळ फेरीवाला मुक्त विभाग घोषित करावा, सर्व बेकायदा फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी, भविष्यात अशा अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे, नागरिकांच्या सुरक्षिततेस...

ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी जगदाळे तर विरोधी पक्षनेतेपदी शानू पठाण

इमेज
नफिसा गिरकर :  ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष पवार पक्षाचे शानू पठाण यांची तर सभागृह नेतेपदी शिवसेनेच्या हणमंत जगदाळे यांची निवड करण्यात आली.  विरोधी पक्षनेते शानू पठाण शानू पठाण यापूर्वी विरोधी पक्षनेते पदी कार्यरत होते तसेच हनुमंत जगदाळे देखील यापूर्वी सभागृह नेतेपदी होते. ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या निवडीची घोषणा करण्यात आली. जानेवारी मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत 131 सदस्य महापालिकेत 75 जागा मिळून शिवसेनेने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर भारतीय जनता पार्टी 28, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 12, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार 9, एम आय एम 5 व शिवसेना उबाठा यांना एका जागेवर विजय मिळाला होता.  सभागृह नेते - हणमंत जगदाळे  शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेची पहिली महासभा पार पडली. त्यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून कामकाज तहकूब करण्यात आले होते. ती सभा सोमवारी घेण्यात आली. 

चित्रपटांतील वाढत्या हिंसाचाराबाबत राज्य शासनाकडे तक्रार

नफिसा गिरकर :  चित्रपटांमध्ये वाढत्या प्रमाणात दाखविण्यात येणाऱ्या हिंसाचार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत मुंब्र्यातील सामाजिक कार्यकर्ता नुरूद्दीन नाईक यांनी पत्राद्वारे राज्य शासनाकडे गंभीर चिंता व्यक्त केली आहे.  नाईक यांनी मुख्यमंत्री तसेच सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून चित्रपटांतील आशयाचा समाजावर, विशेषतः तरुण पिढीवर होणाऱ्या परिणामाबाबत लक्ष वेधले आहे. अनेक चित्रपटांमध्ये हिंसा, गुन्हेगारी आणि समाजविघातक वर्तनाचे गौरवीकरण केले जात आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंसक मार्ग योग्य असल्याचे चित्रण केल्यामुळे तरुणांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या आशयामुळे आक्रमक वृत्ती वाढण्याची तसेच कायद्याबाबत अनास्था निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने चित्रपटांच्या आशयाबाबत अधिक जबाबदारीची भूमिका घ्यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. चित्रपट प्रमाणन प्रक्रियेदरम्यान समाजावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल विचार करावा आणि आवश्यक तेथे कठोर भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले आहे. यासाठी त्यांनी काही ठोस उपाययोजनांचा प्रस्ताव मांडला आ...

सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई - पोलिस सह आयुक्त डॅा ज्ञानेश्वर चव्हाण यांचा इशारा

इमेज
नफिसा गिरकर :  सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणा-यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ठाण्याचे सह पोलिस आयुक्त डॅा ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मुंब्रा मध्ये दिला. गुरुवारपासून रमजान महिन्याला प्रारंभ होत असून त्याच दिवशी शिवजयंती देखील आहे, या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी बुधवारी दुपारी मुंब्रा पोलिस स्थानकाला भेट देऊन अधिका-यांशी  संवाद साधला व परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, काही समाजकंटक सोशल मीडिया व इतर माध्यमातून जाणिवपूर्वक भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतात. पोलिसांचे यावर बारीक लक्ष असून असे प्रकार करणा-यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. यापूर्वी असे प्रकार केलेल्यांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी देखील असे प्रकार समोर आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. अशा प्रकारांमुळे शांतता धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक सौहार्द कायम ठेवण्यात नागरिकांनी सहकार्य करावे असे चव्हाण म्हणाले.  रमजानच्या  महिन्यात  शरीर, मन, विचार व कृती चांगली ठेवली ...

मुंब्रा येथील लष्कर भरतीला चांगला प्रतिसाद, दहा हजार पेक्षा जास्त उमेदवारांचा सहभाग

इमेज
नफिसा गिरकर : मुंब्रा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या लष्करातील अग्नीवीर भरतीचा समारोप  झाला. या भरती प्रक्रियेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून यामध्ये राज्यातील १५ जिल्ह्यांमधील १० हजारहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला. ही भारतीय सेनेची भरती रॅली दोन आठवड्यांच्या काटेकोर छाननी व मूल्यमापन प्रक्रियेनंतर यशस्वीरित्या पार पडली. यामुळे देशसेवेसाठी युवकांमध्ये असलेला उत्साह व निष्ठा अधोरेखित झाली.या कार्यक्रमात ९० टक्क्यांहून अधिक उपस्थिती नोंदविण्यात आली, त्यामुळे भारतीय सेनेबद्दल युवकांमध्ये असलेला विश्वास, अभिमान आणि आदर स्पष्ट झाला, असे लष्करातर्फे सांगण्यात आले. मुंबई शहर,मुंबई उपनगर ठाणे,रायगड, नाशिक,पालघर, धुळे, नंदुरबार तसे पुणे आर ओ मुख्यालयाच्या अंतर्गत येणारे सात जिल्हे इथून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार  उपस्थित राहिले होते. भरती प्रक्रिया निर्धारित नियम व धोरणांनुसार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली. संपूर्ण रॅलीदरम्यान निष्पक्षता, नैतिकता आणि गुणवत्ताधारित निवड प्रक्रियेचे उच्चतम निकष कायम ठेवण्यात आले. शारीरिक चाचण्य...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय शिबिराचा 300 पेक्षा जास्त रुग्णांना लाभ

नफिसा गिरकर : मुंब्रा -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराचा लाभ 300 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंब्रा कौसा मध्यवर्ती कार्यालयात मोफत होमिओपॅथिक औषधे व थेरपी कॅम्पचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील रुग्णांनी भेट देऊन या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रुग्णांना एका आठवड्याची औषधे विनामूल्य देण्यात आल्याची माहिती तौहिद शेख यांनी दिली.डॉक्टर लियाकत परमार व त्यांच्या पथकाने यावेळी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला ,राजन किने ,इब्राहिम राऊत,माजी नगरसेवक जफर नोमानी ,रिदा रशीद, रफीक शेख,मैनुल खान व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून मुंब्रा कौसा येथील तेरा शाळांना प्रोजेक्टर व संगणकांचे वितरण

इमेज
नफिसा गिरकर: भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा कोकण पदवीधर मतदार संघाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मुंब्रा कौसा परिसरातील तेरा शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळांना प्रोजेक्टर आणि संगणक प्रदान करण्यात आले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता  येईल.  यासाठी भाजपच्या कौसा मंडळ अध्यक्षा नाझिया तांबोळी यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे  हा निधी उपलब्ध झाला असल्याचे सांगण्यात आले. वितरण कार्यक्रमादरम्यान शाळा प्रशासनांतर्फे आ.डावखरे व  तांबोळी यांचे आभार मानण्यात आले.  विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर आणि संगणकांच्या साहाय्याने विविध विषय अधिक प्रभावीपणे समजून घेता येतील, डिजिटल माध्यमातून शिक्षण अधिक सोपे आणि आकर्षक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी डावखरे यांनी शैक्षणिक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि तांत्रिकदृष्ट्य...

प्रेषित मोहम्मद यांचा सोशल मीडियावर अवमान; गुन्हा दाखल

नफिसा गिरकर:  सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हॉट्सअँप स्टेटस ठेवून प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी ब्रिजेश दुबे विरोधात मंगळवारी मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा येथे राहणारा ब्रिजेश दुबे याने त्याच्या व्हॉट्सअँप स्टेटसवर एक व्हिडिओ ठेवला होता. त्या व्हिडिओमध्ये प्रेषित मोहम्मद  व इस्लाम धर्माविरूद्ध अपमानास्पद व आक्षेपार्ह उद्गार काढण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अब्दुल अझीम शेख यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीची पोलिसांनी तत्काळ दखल घेत ब्रिजेश दुबे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत कलम 299, 356(2),  आणि 353(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित व्हिडिओ व सोशल मीडिया पोस्टची चौकशी करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा गुन्हा दाखल करण्याच्या व कारवाई करण्याच्या मागणीसाठी सय्यद अली अश्रफ, तौहिद शेख, जफर नोमानी आणि रफिक शेख यांनी पाठपुरावा केला.

मुंब्रा कौसामध्ये रमजान महिन्याला उत्साहात प्रारंभ

इमेज
नफिसा गिरकर : मुंब्रा येथे पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात झाली आहे. चंद्रदर्शनानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत संयम आणि सेवाभावाच्या या महिन्याचे स्वागत केले. शहरातील विविध भागांतील मशिदींमध्ये पहाटेच्या सहरीपासूनच हालचाल सुरू झाली असून रात्री विशेष तरावीह नमाजासाठी मोठी गर्दी होत आहे.मुंब्रा स्टेशन जवळील शैलेश नगर येथील मुख्य रस्त्यावर दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे हा परिसर उजळून निघाला आहे. विविध मशिदी व परिसरात रोषणाई करण्यात आली आहे. धार्मिकदृष्ट्या रमजान हा संयम, आत्मशुद्धी आणि दानधर्माचा महिना मानला जातो. रोजा (उपवास) ठेवून पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी त्यागले जाते. संध्याकाळी इफ्तारच्या वेळी कुटुंबीय आणि मित्रपरिवार एकत्र येऊन रोजा सोडतात.  रमजान व आर्थिक उलाढाल पवित्र रमजान महिन्याच्या आगमनाने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आर्थिक उलाढालीलाही मोठी चालना मिळाली आहे. रोजा व इफ्तार  साठी विविध वस्तूंची मागणी वाढली असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. र...

दारुल फलाह येथील गार्डन १० वर्षांनंतर पुन्हा खुले

इमेज
नफिसा गिरकर : मुंब्रा - दारुल फलाह परिसरातील गार्डनचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे तौहिद शेख व नगरसेवक इब्राहिम राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे दहा वर्षे हे गार्डन बंद अवस्थेत होते. दरम्यानच्या काळात या ठिकाणी नशेखोरांचा अड्डा निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता हे गार्डन पूर्ववत करण्यात आले असून येथे नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.  या गार्डनमुळे आता परिसरातील नागरिक व लहान मुले याचा लाभ घेऊ शकतील.  याठिकाणी कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले असून वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. “गार्डनमध्ये कोणतेही चुकीचे कृत्य होऊ देणार नाही, तसेच गार्डन अधिक सुशोभित करून पुन्हा विकसित करण्यात येईल,” असे आश्वासन तौहिद शेख यांनी दिले.  नगरसेवक इब्राहिम राऊत यांनी सांगितले की, “मागील अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती. या प्रभागात आमच्या उमेदवारांच्या पराभवानंतरही विकासकामे...

हलाल उत्पाद उपलब्ध कराती कौम आउटरीच प्राइवेट लिमिटेड कंपनी

इमेज
हलाल उत्पाद उपलब्ध कराती कौम आउटरीच प्राइवेट लिमिटेड कंपनी  हलाल उत्पाद उपलब्ध कराती कौम आउटरीच प्राइवेट लिमिटेड कंपनी, कौम उपभोक्ताओं को लगभग 27 हलाल  उत्पाद प्रदान करती है। इसमें डॉ. हलाल जैसे स्वास्थ्य उत्पाद शामिल हैं। इसके साथ ही कौम अपने ग्राहकों को शहद से लेकर नहाने के साबुन और कॉस्मेटिक उत्पाद तक सब कुछ उपलब्ध करा रहा है और इसके उत्पाद ऑनलाइन उपलब्ध हैं। आप कौम के उत्पाद से जुड़ी सारी जानकारी Kaum.in से प्राप्त कर सकते हैं।

फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने...

फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने... कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यशी निकराची झुंज देत असलेली व्यक्ती अनेकांच्या पाहण्यात येत असते. जीवनातील शेवटची घटका मोजत असलेले असे हजारो रूग्ण आपल्या आसपास आहेत की, ज्यांच्या डोळ्यादेखत अवयव देऊ करणारा दाता दिसत असूनही त्यांना त्यांचे प्राण वाचविता येत नाहीत. लोकसंखेच्या बाबतीत जगात पहिला असणारा एकशे चाळीस कोटींचा भारत देश अवयावदानात मात्र जगात शेवटून दुसरा असावा ही एक शोकांतिका म्हणता येईल. ही वस्तुस्थिती दूर व्हावी या उद्देशाने देशात अनेक व्यक्ती व संस्था अवयवदान या विषयात झटून कार्यरत आहेत. मात्र त्यांचे कार्य एकसंघ व्हावे, त्यांना त्यांच्या कार्यात येणाऱ्या सरकारी तसेच इतर प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात, अवयवदान व देहदान या संदर्भातील लोकप्रबोधनाच्या कामाला मोठी चालना मिळावी याकरीता या सर्व लहानमोठ्या संस्था एका धाग्याने बांधून या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेने महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर देश पातळीवरही सुरू केला आहे. फ...

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 397 उमेदवारां चे 512 अर्ज दाखल मुंबई : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारां चे 512 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात - 30 उमेदवारांचे 42 अर्ज, दिंडोरी - 20 उमेदवारांचे 29 अर्ज, नाशिक - 39 उमेदवारांचे 56 अर्ज, पालघर  - 17 उमेदवारांचे 26 अर्ज, भिवंडी - 41 उमेदवारांचे 48 अर्ज, कल्या ण - 34 उमेदवारांचे 45 अर्ज,  ठाणे  - 36 उमेदवारांचे 43 अर्ज, मुंबई उत्तर - 25 उमेदवारांचे 32 अर्ज,...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याचे मानधन नाही, कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याचे मानधन  नाही, कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ मुंबई  :   महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.           महाराष्ट्रातील दोन लाख दहा हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधना अभावी उपासमार होत आहे. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र, अध्यक्षा ॲड. निशा  शिवूरकर यांनी  निवडणूक प्रचारात मग्न असलेल्या मुख्यमंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्र्याकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन त्वरीत जमा करण्याची मागणी केली  आहे.         सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षण, आरोग्याची कामे सोपवली जातात. परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी मात्र टाळत आहे. सणासुदीच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱ्यांना मुश्कील झाले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे,  असे सरचिटणीस कमल...

भाजपतर्फे नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, शुक्रवारी अर्ज दाखल करणार

भाजपतर्फे नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, शुक्रवारी अर्ज दाखल करणार मुंबई - रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपने हिसकावून घेतला आहे.  तत्पूर्वी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यातर्फे माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने राणे यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले.  २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले होते. १९९६  पासून या मतदारसंघातून २००९ चा अपवाद वगळता शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आता महायुतीमध्ये भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. २००९ मध्ये निलेश राणे हे कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते.  या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर हे विधानसभा मतदारसंघ तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ समाव...

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

  वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार मुंबई :  महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर संकलनात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांक गाठलेला असून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून पहिल्यांदाच रूपये ३ लक्ष कोटींचा टप्पा पार केलेला आहे. या वर्षी राज्याचे वस्तू व सेवा कर संकलन, रूपये ३.२ लक्ष कोटी एवढे झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये १८ टक्के एवढी घसघशीत वाढ नोंदवलेली असल्याची माहिती मुंबईचे राज्यकर उपआयुक्त यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील वस्तू व सेवा कर संकलनाचा देशातील (रूपये २०.२ लक्ष कोटी) सकल वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के नोंदविला असून गतवर्षीच्या तुलनेत (१५ टक्के) त्यामध्ये सुमारे १ टक्का वाढ दिसून येत आहे. तसेच वस्तू व सेवा कर संकलनातील राज्याचा वाढीचा दर (१८ टक्के) हा देशाच्या सरासरी दरापेक्षा (१२ टक्के) अधिक आहे. राज्याच्या निव्वळ महसुलाचा विचार करता, राज्यास वस्तू व सेवा करातून रूपये १,४१,७०० कोटी एवढ़ा उच्चांकी महसूल मिळालेला असून त्यामध्ये राज्य व सेवा कर (SGST)...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51वा तर अनिकेत हिरडे यांनी  81 वा क्रमांक पटकावला आहे. एक नजर निकालावर समीर प्रकाश खोडे (४२) नेहा उद्धवसिंग राजपूत (५१) अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (८१) विनय सुनील पाटील (१२२) विवेक विश्वनाथ सोनवणे (१२६) तेजस सुदीप सारडा (१२८) जान्हवी बाळासाहेब शेखर (१४५) आशिष अशोक पाटील (१४७) अर्चित पराग डोंगरे (१५३) तन्मयी सुहास देसाई (190) ऋषिकेश विजय ठाकरे (२२४) अभिषे...

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनी राज्यात १ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान एकूण ४२१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, फ्रिबीज, मौल्यवान धातूंचा इतर बाबींचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई करण्यासाठी आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत राज्य व जिल्हा पातळीवर भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), नेमण्यात आली आहेत. या पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे. १ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत राज्यातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ३९.१० कोटी रुपयांची रोख रक्कम, २७.१८ कोटी रुपये किंमतीची ३३ लाख ५६ हजार ३२३ लिटर दारु, २१२.८२ कोटी रुपये किंमतीचे ११ लाख ४२ हजार ४९८ ग्रॅ...

स्वतःच्या मुलीचा खुन करून मृतदेह पुरणा-या आई-वडीलांना मुंब्रा पोलीसांनी केली अटक

स्वतःच्या मुलीचा खुन करून मृतदेह पुरणा-या आई-वडीलांना मुंब्रा पोलीसांनी केली अटक मुंब्रा :  दीड वर्षीय मुलीची हत्या केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आई वडिलांना अटक केली आहे. या दीड वर्षीय मयत मुलीला 19 मार्च रोजी  मध्यरात्री अडीच वाजता दफन करण्यात आले होते. पोलिसांनी मेडफॉर्ड हॉस्पिटल व अलमास हॉस्पिटल यांच्याकडे  चौकशी करून मुलीवर करण्यात आलेल्या उपचाराची माहिती मिळाली. या दोन रुग्णालयातील मुलींच्या उपचाराचा बाबत विसंगती आढळुन आली. मुलीचे आई - वडील  जाहीद  शेख व बुरानी  शेख यांच्याकडे चौकशी केल्यावर ते  मुलीच्या मृत्युचे कारण लपवीत असल्याचे त्यांच्या जबाबावरून स्पष्ट झाले होते. पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या,  याबाबत कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त उत्तन कोळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.  मुलीच्या मृत्यु नंतर सदर घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही माहिती न देता तसेच रूग्णालयात मयत मुलीच्या दुखापतीबाबत चुकीची माहिती देवून रुग्णालयाकडून मृत्यु दाखला (डि.सी.) प्राप्त करून घेतला.   मयत मुलीला रितीरिवाजाप्र...