भारत हा केवळ शेजारी देश नसून विश्वासू मित्र- फरहाना चौधरी- बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन व राष्ट्रीय दिन उत्साहात साजरा
नफिसा गिरकर : (मुंबई) - भारत हा बांगलादेशाचा केवळ शेजारी देश नसून विश्वासू मित्र आहे. दोन्ही देशांमध्ये सुमारे ४००० किमी सीमा असून दोन्ही देशातील परस्पर संबंध तळागाळापर्यंत पोहोचले आहेत, असे बांगलादेशच्या मुंबईतील उप-उच्चायुक्त फरहाना चौधरी म्हणाल्या. बांगलादेशचा स्वातंत्र्याचा ५५ वा वर्धापनदिन नुकताच मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य सरकारचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फरहाना चौधरी म्हणाल्या, हा दिवस केवळ राष्ट्रनिर्मितीचा नसून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांचे स्मरण करण्याचा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. २०२४-२५ या कालावधीत दोन्ही देशांतील व्यापार सुमारे १२ बिलियन यूएस डॉलर्सपर्यंत पोहोचल्याची माहिती देत, द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित नेतृत्व आणि विश्वासू भागीदारीचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे वि...