पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शहापूरजवळ क्रेन कोसळून 16 कामगारांचा मृत्यू

शहापूरजवळ क्रेन कोसळून 16 कामगारांचा मृत्यू लोकमानस प्रतिनिधी   ठाणे-  शहापूर जवळील सरलांबे येथे समृध्दी महामार्गाचे काम सुरु असताना क्रेन कोसळून 16 कामगारांचा मृत्यू झाला. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम येथे सुरु होते.  सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याने या दुर्घटनेत एवढे बळी गेले. सुमारे 100 फूट अंतरावरुन ही महाकाय क्रेन कोसळली त्याखाली दबून कामगारांचा मृत्यू झाला. 

पीक विमा अर्ज भरण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ -कृषिमंत्री धनंजय मुंडे

पीक विमा अर्ज भरण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ -कृषिमंत्री धनंजय मुंडे   मुंबई, दि. 31 : पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवू

प्रसिध्द बिल्डर फरीद नुरी यांचा आयकॉन 2023 पुरस्काराने सन्मान

इमेज
प्रसिध्द बिल्डर फरीद नुरी यांचा आयकॉन 2023 पुरस्काराने सन्मान मुंबई - प्रतिनिधी  प्रसिध्द बिल्डर फरीद नुरी यांचा नुकताच आयकॉन 2023 पुरस्काराने सन्मान  मुंब्रातील नूरी कंस्ट्रक्शन और नूरी फाउंडेशन चे अध्यक्ष, फरीद जरीवाला (नूरी) यांना मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या मिड-डे दैनिकातर्फे आयोजित मिड-डे  इंफ्रास्ट्रक्चर  कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 'आयकॉन - 2023' पुरस्कार देण्यात आला.  फरीद नुरी हे प्रथितयश बिल्डर असून सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर असतात.   फरीद नुरी यांनी आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा व उच्च विचारसरणीवर मार्गक्रमण करत मुंब्रा येथून प्रारंभ करत आज ठाणे व मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात  आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांचे अनेक प्रकल्प मुंब्रा,  वांद्रे,  वरळी यासह विविध भागात सुरु आहेत.  या पुरस्काराने सन्मानित झाल्याने फरीद नुरी यांचे समाजातून मोठे कौतुक केले जात आहे.   सामाजिक,  शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात नुरी यांचे मोठे योगदान आहे.  अतिशय कष्टातून प्रचंड मेहनत व संघर्ष करत नुरी यांनी गृह निर्माण क्षेत्रात आपली वेगळी ओळ

भिडे हा समाजघातक किडा असून त्याला वेळीच ठेचा -आ. डॉ. जितेंद्र आव्हाड

भिडे हा समाजघातक किडा असून त्याला वेळीच ठेचा -आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे सरकारला आवाहन , आव्हाडांनी नोंदविली पोलीस ठाण्यात तक्रार लोमानस प्रतिनिधी  ठाणे - मनोहर भिडे हा खोटारडा माणूस आहे. तो सातत्याने महापुरुष, समाजसुधारकांच्या बाबतीत गरळ ओकत आहे. ज्यांचे विचार सबंध जगाने स्वीकारले. त्या महात्मा गांधी यांच्याबाबत हा काहीही बोलतो. भिडे सारख्या प्रवृत्ती या अफझल खानाचा वकील कृष्णा वकील याच्या औलादी आहेत.त्यामुळे  भिडे हा समाजघातक किडा असून त्याला वेळीच ठेचा, अशी मागणी करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस , आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मनोहर भिडे याला अटक करण्याची मागणी केली. बुधवारपर्यंत भिडे याला अटक न केल्यास सभागृह चालू न देण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.  डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन भिडे याच्या विरोधात रितसर लेखी तक्रार दाखल केली. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवाध्यक्ष विक्रम खामकर आदी उ

सभापती गोऱ्हे यांनी केलं आ. सत्यजीत तांबेंचं कौतुक- शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत जागरूक असल्याचा शेरा- आ. तांबे यांनी सादर केली सर्व मुद्द्यांची टिपण्णी

इमेज
  सभापती गोऱ्हे यांनी केलं आ. सत्यजीत तांबेंचं कौतुक - शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत जागरूक असल्याचा शेरा - आ. तांबे यांनी सादर केली सर्व मुद्द्यांची टिपण्णी लोकमानस  प्रतिनिधी मुंबई -  आपण सातत्याने चांगलं काम करत राहिलो, तर त्या कामाची दखल घेतली गेल्याशिवाय राहत नाही, याची प्रचिती आ. सत्यजीत तांबे यांना विधान परिषदेत आली. शिक्षण विभागासंबंधी चाललेल्या चर्चेदरम्यान सभापती नीलम गोऱ्हे यांनी आ. तांबे यांचा नामोल्लेख करत कौतुक केलं. शिक्षण विभागासंबंधीच्या सर्व मुद्द्यांबाबत एक टिपण्णी तयार करून द्यावी, असं आवाहन आपण सर्व सदस्यांना केलं होतं. पण फक्त आ. सत्यजीत तांबे यांनी अशी अत्यंत अभ्यासपूर्ण टिपण्णी सादर केली आहे, असं त्या म्हणाल्या.  नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यापासून आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहात दमदार कामगिरी केली आहे. या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी शिक्षण व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांची आधारकार्ड पडताळणी, शिक्षक भरती, शाळांना अनुदान, सीईटी परीक्षेदरम्यानच्या तांत्रिक अडचणी अशा अनेक समस्यांसंदर्भात या अ

मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर,  सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश,  आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे- आवाहन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज बुधवार दिनांक २६ जुलै २०२३ रात्री ८ वाजेपासून उद्या गुरूवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे. दरम्यान, अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सु

सफाई कामगारांच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी - उपसभापती डॉ निलम गोऱ्हे, सफाई कामगारांबाबत आमदार भाई गिरकर यांनी उपस्थित केला प्रश्न

सफाई कामगारांच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी - उपसभापती डॉ निलम गोऱ्हे,   सफाई कामगारांबाबत आमदार भाई गिरकर यांनी उपस्थित केला प्रश्न लोकमानस प्रतिनिधी मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांची दोन वेळा आरोग्याची चाचणी करून उपचार केले जातात मात्र त्यांना दिले जाणारे मास्क, मोजे हे फाटके असतात. ते किती वेळा दिले जातात, त्याचा दर्जा काय आहे हे बघण्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र सातत्याने हा गोंधळ होत असून त्याच कारण म्हणजे या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होणे हे आहे. यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.  प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये आमदार विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.  या विषयाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असून या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. मॅनहोल मध्ये जाऊन लोक दगावत आहेत तरीही त्याच्यावर उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण विषयाबाबत मुख्यम

मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नसीम खान यांची मागणी

मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नसीम खान यांची मागणी लोकमानस प्रतिनिधी मुंबई -  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार मुस्लिम आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली.  मुस्लीम समाजाला देण्यात आलेले आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लीम समाजाला देण्यात आले होते. मा. उच्च न्यायालयानेही विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत सामिल करुन शैक्षणिक आरक्षण बहाल केले व नोकरीतील आरक्षण पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली होती. मागील ९ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत आहे. मुस्लीम समाजात ५० घटक आहेत, याचा सर्वंकष विचार करुन मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंत

भिवंडी, मुंब्रा येथे वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी महावितरणतर्फे नोडल अधिकारी नियुक्त

भिवंडी, मुंब्रा येथे वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी महावितरणतर्फे नोडल अधिकारी नियुक्त लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोरेंट या फ्रँचायजी कंपनीच्या भिवंडी व मुंब्रा संदर्भात ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी महावितरणतर्फे नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन शुक्रवारी विधानसभेत दिले होते. त्यानुसार महावितरणतर्फे मुंब्रा, कळवा व शीळसाठी मंगळवारी व शुक्रवारी तर भिवंडीसाठी बुधवारी आणि गुरुवारी नोडल अधिकारी त्यांच्या व्यवस्थेसह उपस्थित असतील. नोडल अधिकाऱ्यांची सेवा  २५ जुलै पासून उपलब्ध असेल, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांनी सांगितले. शीळ, मुंब्रा, कळवा वितरण फ्रँचायजी विभागातील वीज ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींच्या निवारणासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व उच्चस्तरीय लिपिक (लेखा) प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत शीळ, मुंब्रा, कळवा नोडल कार्यालय येथे उपस्थित असतील. त्यांचा संपर्क क्रमांक ८४११८४२२४४  आह

समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - देवेंद्र फडणवीस

समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार  -  देवेंद्र फडणवीस लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : समाज माध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती  नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' व 'हिंदू पोस्ट' ही संकेतस्थळे तत्काळ बंद करून संकेतस्थळ चालविणाऱ्या व लिखाण प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.  ते म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या कार्याविषयी खोट्या माहितीच्या आधारे चुकीची मांडणी करून  समाजाच्या भावना दुखावणारा अपमानास्पद लेख इंडिक टेल्स व 'हिंदू पोस्ट' या संकेतस्थळ आणि bhardwajspeaks या ट्व‍िटर अकाऊंटधारकाने प्रसारित केला असल्याची बाब ३१ मे २०२३ रोजी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने निदर्शनास आली आहे.

मणिपूर प्रकरणाचा मुंब्र्यात मौलानांनी केला निषेध, राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी

इमेज
मणिपूर प्रकरणाचा मुंब्र्यात मौलानांनी केला निषेध, राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी  प्रतिनिधी  मणिपूर येथे घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे सभ्य समाजाचे नियम पायदळी तुडवले गेले आहेत. या घटनेत सामिल असलेल्या दोषींविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी मुंब्रा मध्ये झालेल्या ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाच्या बैठकीत करण्यात आली. मणिपूर घटनेच्या निषेधार्थ मुंब्रा कौसा परिसरातील मौलानांनी बैठक घेऊन या घटनेचा अत्यंत कठोर शब्दांत निंदा केली व निषेध केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत मौलाना मोईनुद्दीन अश्रफ होते. मणिपूर गेल्या काही महिन्यांपासून  धुमसत आहे. महिलांसोबत झालेल्या घटनेने सर्व सीमा पार झाल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणी केंद्र सरकारने मणिपूरमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी मौलाना मोईनुद्दीन अश्रफ यांनी केली. मुंब्रा येथे झालेल्या या बैठकीत उपस्थित मौलानांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली व अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मौलाना अश्रफ यांच्या सोबत यावेळी मौलाना मेहफुज, मौ. सुफी, म

केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध ९ ऑगस्टला कामगारांचे जिल्हास्तरीय मोर्चे

केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध ९ ऑगस्टला कामगारांचे जिल्हास्तरीय मोर्चे लोकमानस प्रतिनिधी  महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटना एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या  धोरणाविरुद्ध  ९ ऑगस्टला  क्रांती दिनाच्या दिवशी जिल्हास्तरीय मोर्चे काढून केंद्र  सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध करणार आहेत.    महाराष्ट्र कामगार कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कऱ्हाड यांनी ही माहिती दिली.  दीडशे वर्षांपूर्वी भारतातील कामगार चळवळीने  संघर्ष करून ऐतिहासिक कामगार कायदे निर्माण केले, परंतु  भांडवलधार्जिण्या  केंद्र सरकारने  या कायद्याचे  रूपांतर मालकांना हवे तशा चार कायद्यात केले आहे.  कृती समितीमध्ये एकत्र आलेल्या कामगार संघटनांची एकत्रित सभासद संख्या २५  लाखाहून जास्त आहे.  आज असंघटित अशा चार कोटी कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न महत्त्वाचा असून, त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी, आशा कामगार, सफाई व कंत्राटी कामगार यांचे प्रश्न देखील फार महत्वाचे आहेत.  केंद्र सरकारच्या  या कामगार  व देश विरोधी धोरणाविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने २

इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १६ जणांचा मृत्यू, १०० बेपत्ता, ९३ जणांना वाचवण्यात यश

 इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १६ जणांचा मृत्यू, १०० बेपत्ता, ९३ जणांना वाचवण्यात यश  प्रतिनिधी -  जोरदार सुरु असलेल्या पावसाचा फटका बसून रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळली. या वाडीत ४८ कुटुंबे राहत होती. त्यातील सुमारे ३० घरांवर दरड कोसळली. दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंबे अडकली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री प्रशासनाने मदतकार्यासला प्रारंभ केला. पहाटे एनडीआरएफच्या पथकाने मदतकार्य सुरु केले. आतापर्यंत या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ९३ जणांना वाचविण्यात यश आले असून १०० जण बेपत्ता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  दुर्गम भागात ही दुर्घटना घडली असल्याने व मुसळधार पाऊस सातत्याने सुरु असल्याने मदत व बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्यासाठी दीड ते दोन तासांची पायपीट करणे गरजेचे आहे. थेट रस्ता नसल्याने घटनास्थळी जेसीबी नेणे प्रशासनाला अशक्य झाले आहे.  इरशाळ आदिवासी वाडीत ४८ कुटुंबांतील २८८ जण वास्तव्याला होते. त्यापैकी ९३ जण सुखरूप असल्याची समोर आल

किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या चौकशीची केली मागणी

किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या चौकशीची केली मागणी,  विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभापतींकडे सादर केला पेनड्राइव्ह मुंबई -  माजी खासदार असलेले किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषद सभागृहात सभापतींकडे सादर केला. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली.      डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला काही राजकारणी छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. महामंडळांवर विविध पदांचा प्रलोभने दाखवून, ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांची भीती दाखवून काही महिला अधिकाऱ्यांना धमकी देऊन त्यांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.   सदर पेनड्राइव्हमध्ये मराठी स्त्रियांविषयी अश्लील भाषेत संभाषण आहे, या विषयी तपास करावा. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे.    तसेच या पेनड

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत, एका वर्षात १०,५०० पेक्षा अधिक रुग्णांना लाभ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत, एका वर्षात १०,५०० पेक्षा अधिक रुग्णांना लाभ मुंबई -  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या एका वर्षात १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते.   शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तत्काळ सुरू केला. मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्येज १२३७

रोजगाराच्या संधीसाठी कौशल्ये आत्मसात करा- आ. सत्यजीत तांबे यांचा तरुणांना कानमंत्र- पदवीसोबत इतर कौशल्ये आत्मसात करण्याचा सल्ला

रोजगाराच्या संधीसाठी कौशल्ये आत्मसात करा- आ. सत्यजीत तांबे यांचा तरुणांना कानमंत्र - पदवीसोबत इतर कौशल्ये आत्मसात करण्याचा सल्ला लोकमानस प्रतिनिधी-  सध्याच्या तरुणांसमोरील सर्वात मोठी समस्या कोणती, असा प्रश्न विचारला तर 'बेरोजगारी' असं उत्तर हमखास मिळतं. पण दुसऱ्या बाजूला कंपन्यांना हवी तशी माणसं मिळत नसल्याचंही चित्र आहे. नेमक्या याच समस्येवर आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुणांना एक उपाय सुचवलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आ. तांबे यांची ही क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. फक्त डिग्रीच्या कागदावर विसंबून राहू नका, त्याशिवाय इतरही कौशल्य आत्मसात करा. कंपन्या कुशल लोकांना प्राधान्य देतात, असं ते या व्हीडिओत म्हणत आहेत. भाषणाची लिंक आ. सत्यजीत तांबे सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून सातत्याने तरुणाईसमोरच्या प्रश्नांवर भाष्य करत असतात. नुकताच मुलींच्या आणि मुलींच्या वडिलांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षांबाबतचा त्यांचा व्हीडिओ चांगलाच गाजला होता. आता पुन्हा एकदा अशाच एका व्हीडिओने तरुणांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या व्हीडिओत आ. तांबे बेरोजगारी आणि रोजगाराच्या संधी याच्यावर भाष्य करत आहेत. कोण

पत्रकार कविराज चव्हाण यांची जे. जे. रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर नियुक्ती

इमेज
पत्रकार कविराज चव्हाण यांची जे. जे.  रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर नियुक्ती लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार कविराज चव्हाण यांची सर जे. जे.  रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर तज्झ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  राज्य सरकारच्या शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर सरकारने नियुक्ती जाहीर केली आहे.  वैद्यकीय शिक्षण विभागाकडून याबाबतचा जीआर जारी करण्यात आला आहे.  जे. जे.  रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री मंगलप्रभात लोढा,  सदस्यपदी आमदार पराग अळवणी, आमदार यामिनी जाधव,  संदीप म्हात्रे,  युसूफ रंगवाला,  अभिषेक शिंदे या इतर सदस्यांची नियुक्ती झाली आहे.   कविराज चव्हाण यांनी या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केले व रुग्णांना उपचारांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.  

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर लोकमानस प्रतिनिधी  मुंबई :  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.  इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे: छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय हसन मियाँ

सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले व बाळासाहेबांच्या विचारांना तुम्हीच महाकलंक लावला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उध्दव ठाकरेंवर घणाघाती टीका

सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले व  बाळासाहेबांच्या विचारांना तुम्हीच महाकलंक लावला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उध्दव ठाकरेंवर घणाघाती टीका, आम्हालाही बोलता येते, संस्कारामुळे मर्यादा सोडून बोलत नाही, बोलायला लागलो तर पळता भुई थोडी होईल, ठाकरेंना इशारा मुंबई - प्रतिनिधी  बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा सत्तेवर लाथ मारली, मात्र दुसरीकडे तुम्ही केवळ सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. बाळासाहेबांनी ज्यांना कायम दूर ठेवले त्यांना सोबत घेतले, ज्या मतदारांनी निवडून दिले त्या मतदारांना धोका दिला व बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही महाकलंक लावला अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर केली. ठाण्यात शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. २०१७ च्या मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापालिकेची सत्ता भाजप घेऊ शकत होती मात्र त्यांनी उदारपणे सत्तेचा दावा सोडला व ती सत्ता तुम्हाला दिली. त्याबदल्यात तुम्ही भाजपला काय दिले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा तुमचा कृतघ्नपणा आहे, वरुन तुम्ही देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हणता, असे शिंदे म्हणाले. २०१९ च्या विधान

माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

  माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला   लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. फेब्रुवारी २०२२ ला मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी ने अटक केली होती. मलिक यांचे गॅंगस्टर दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांसोबत संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.  नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ते खासगी रुग्णालयात दाखल आहेत. न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर याबाबत सुनावणी झाली होती त्यानंतर याबाबतचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आज न्यायालयाने हा निकाल जाहीर केला.  विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज नोव्हेंबर २०२२ मध्ये फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय कारणास्तव उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकिल अॅड अमित देसाई यांनी युक्तीवाद केला होता तर ईडी तर्फे अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंह यांनी बाजू मांडली

नाविक कामगारांसाठी वाराणसी येथे नुसी चे कार्यालय सुरु

  नाविक कामगारांसाठी वाराणसी येथे नुसी चे कार्यालय सुरु लोकमानस प्रतिनिधी  उत्तर प्रदेशातील नाविक कामगारांसाठी नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया (नुसी)  ने वाराणसी येथे  २२ व्या  शाखा कार्यालयाचे भव्य ऊदघाटन केले.  ८ जुलै रोजी नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर  यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.    या कार्यक्रमाला इंडियन कोस्टल कॉन्फरन्स शिपिंग असोसिएशन (ICCSA) चे सचिव कॅप्टन राकेश सिंग,  जनार्दन बहिरत, एलिगंट मरीन सर्व्हिसेस प्रा.  लि., कॅप्टन करण मदन, अँग्लो इस्टर्न शिप मॅनेजमेंट प्रा.  लि., संघटक सचिव सुरेश सोलंकी  आणि न्यूसीचे 1500 हून अधिक नाविक कामगार ऊपस्थित होते.    नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार  मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशभरातील आमच्या नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या काळजी घेण्यासाठी नुसी वचनबद्ध आहे.  अधिकाधिक नुसी सदस्यांना त्यांच्या भारतीय आणि परदेशी ध्वज करार आणि कल्याणकारी उपक्रमांचे लाभ मिळावेत यासाठी नुसी आपल्या शाखांचा विस्तार करत आहे.  फ्लीट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे आयोजि

दिव्यांगांच्या टी स्टॉल वाटपात सावळा गोंधळ, दिव्यांग संघटनांच्या हरकतींनंतरही जाहिरातीशिवाय स्टॉलचे वाटप

दिव्यांगांच्या टी स्टॉल वाटपात सावळा गोंधळ,   दिव्यांग संघटनांच्या हरकतींनंतरही जाहिरातीशिवाय स्टॉलचे वाटप -  त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने दिव्यांगांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलनात्मक मार्ग अनुसरण्याचा इशारा दिला आहे लोकमानस प्रतिनिधी -   ठाणे - स्वारस्य अभिव्यक्ती देकार तत्वावर दिव्यांगांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ठाणे महानगर पालिका परिक्षेत्रात चहाचे स्टॉल वाटप करण्यात येणार आहेत. हे स्टॉल उभारण्यासाठी ठाणे महानगर पालिकेकडून जागा देण्यात येणार असून त्याचे संपूर्ण काम मे.टी स्टॉल ऑनर्स वेल्फेअर असोशिएशन,  यांस देण्यात आलेले आहे.  या संस्थेने तयार केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत गरजू दिव्यांगांना बाजूला सारून मर्जीतील आणि राजकीय वरदहस्त असलेल्या दिव्यांगांचाच समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात ठाणे शहरात कार्यरत असलेल्या दिव्यांगांच्या तिन्ही संघटनांनी हरकत नोंदवून जाहिरात काढून स्टॉलचे वाटप करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने दिव्यांगांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलनात्मक मार्ग अनुसरण्याचा इशारा दिला आहे.        मे.टी स्टॉल ऑ

मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक :- अतुल लोंढे

  मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक :- अतुल लोंढे, फॉक्सकॉनने वेदांताची साथ सोडल्याने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान, वेदांता-फॉक्सकॉन भाजपा सरकारने घालवल्याने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  वेदांदा-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता पण गुजरात विधानसभा  निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला पण आता हा प्रकल्प  गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा  प्रकल्प बारगळला आहे. हा प्रकल्प पुण्यात होणार होता ,  त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती ,  मविआ  सरकारनेही सर्व सवलती व सुविधा देण्याची तयारी दर्शवली होती पण महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला  पळवून नेला पण आता तो तिथेही होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे मोठे नुकसान  झाले आहे. म्हणूनच मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक आहेत ,  अशी  घणाघाती टीका महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेला संब

पोलिसांनी तपास कामांत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  पोलिसांनी तपास कामांत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे – उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकमानस प्रतिनिधी  मुंबई-  जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक  परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पोलिस देशातील नावाजलेली संस्था आहे. आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा मोठी आहे. आता स्पर्धात्मक वातावरणास सामोरे जाण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. आपल्याला सर्वोत्तम रहावेच लागेल आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण पोलिसिंग केले आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला अधिक समृद्ध करण्यासाठी आणि नावलौकिक आणखी वाढवण्यासाठी संस्थात्मक भाव (In

तृणमूल कॉंग्रेसतर्फे साकेत गोखलेंसहित सहा जणांना राज्यसभेची उमेदवारी

इमेज
तृणमूल कॉंग्रेसतर्फे साकेत गोखलेंसहित सहा जणांना राज्यसभेची उमेदवारी  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - तृणमूल कॉंग्रेसने महाराष्ट्रातील साकेत गोखले सहित सहा जणांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. गोखले सध्या पक्षाचे  राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत. पक्षाने राज्यसभेतील विद्यमान पक्षनेते डेरेक ओ ब्रायन,  विद्यमान खासदार डोला सेन व  सुखेंदु शेखर यांच्यासहित पक्षाचे पदाधिकारी समीरुल इस्लाम, प्रकाश चिक बराईक यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. साकेत गोखले हे ठाण्याचे असून माजी पत्रकार आहेत. 

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

 महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद पाडण्यात आले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका,  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश  लोकमानस प्रतिनिधी  -  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अनेक लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद करण्यात आले होते. त्या सरकारमध्ये सगळे अहंकाराने भरले होते, सर्वांना प्रचंड इगो होता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.  मात्र शिवसेना भाजप युतीचे सरकार गेल्यावर्षी सत्तेत आल्यानंतर आम्ही या बंद करण्यात आलेल्या लोकहिताच्या प्रकल्पांना चालना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारडून राज्याच्या विकासकामांना आवश्यक तेवढा निधी मिळतो. राज्याच्या प्रत्येक विकासाच्या प्रस्तावाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास मंदावला होता आता आम्ही पुन्हा जोमाने काम करुन २०१४ च्या सरकारमधील लोकहिताचे प्रकल्प आम्ही सुरु केले आहेत. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडून निधी मिळत नसल्याची बोंब करत होती, मात्र  को

राहुल गांधीना दिलासा नाहीच, गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

राहुल गांधीना दिलासा नाहीच, गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली लोकमानस प्रतिनिधी  कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत ही याचिका करण्यात आली होती. मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्यावर गु्न्हा नोंदवण्यात आला होता व त्यामध्ये त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सत्र न्यायालयात देखील यात दाद मागितली होती मात्र सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती त्याविरोधात गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तिथेदेखील त्यांना दिलासा मिळाला नाही त्यामुळे आता त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल.  या निर्णयामुळे राहुल गांधी यांचे निवडणूक लढवण्याचे मार्ग सध्यातरी बंद झाले आहेत. न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधी यांच्यासमोरील आव्हानांत अधिक वाढ झाल्याचे चित्र तयार झाले आहे. 

नववधू प्राजक्ताचा मृत्यूशी संघर्ष, आर्थिक मदतीचे आवाहन

  नववधू प्राजक्ताचा मृत्यूशी संघर्ष,  आर्थिक मदतीचे आवाहन लोकमानस प्रतिनिधी - मुंबई   पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नववधू प्राजक्ता खरात - दडस हिचा मृत्यूसोबत संघर्ष सुरू आहे.  अपघात घडल्यापासून प्राजक्ता बेशुद्ध अवस्थेत आहे. या  दुर्घटनेला साधारण ५० तास उलटून गेले आहेत. या अपघातात त्यांची सासू उज्वला दडस जागीच ठार झाल्या. तर पती, सासरे व अन्य एक नातलग गंभीर जखमी झाले. पण प्राजक्ताची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. तिच्या मेंदूला मार लागला आहे. इतर अवयवांनाही इजा झालेली आहे. पण मेंदूची दुखापत चिंताजनक आहे.      माण (माहेर) व फलटण (सासर) मार्गे ती  मुंबईतील विक्रोळी येथील सासरच्या घरी पहिले पाऊल टाकणार होती. नववधूच्या स्वागतासाठी आरतीचे ताट तयार करण्यात आले होते. पण त्या अगोदरच काळाने घाला घातला. फलटण येथे बुधवारी (ता. २८ जून) प्राजक्ताचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला होता. पण अवघ्या पाचव्याच दिवशी (ता. ३ जुलै) तिचा भीषण अपघात झाला.       कामोठे येथील MGM रूग्णालयात तिच्यावर दोन दिवस उपचार सुरू

रेल्वेमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षितेबाबत महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वयाने काम करावे : उपसभापती डॉ.नीलम गो-हे

इमेज
रेल्वेमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षितेबाबत महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वयाने काम करावे : उपसभापती डॉ.नीलम गो-हे लोकमानस प्रतिनिधी          मुंबई, दि.५: निर्भया फंडाचा निधी वाढवून देणे,रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षितेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देणे,रेल्वेमध्ये बेकायदेशीर प्रवास करणा-या प्रवाश्यांवर तत्काळ रेल्वे पोलीसांनी कारवाई करावी, रेल्वेमध्ये प्रवास करताना अपघात अथवा छेडछाडीची घटना घडल्यास पुनर्वसनासाठी तसेच वैद्यकीय मदत मिळावी यासाठी  रेल्वेने योग्य ती कार्यवाही करावी.रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षतेबाबत महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वयांनी काम करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिल्या.        विधानभवन येथे रेल्वमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षितेबाबत आयोजित बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गो-हे बोलत होत्या.यावेळी गृह विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार सिंह,पोलीस महासंचालक (रेल्वे) डॉ.प्रज्ञा सरवदे,पोलीस आयुक्त(रेल्वे)  रविंद्र शिसवे, मुंबई मध्य रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋुषी शुक्ला

पावसाळ्यात काळजी घेण्याचे टोरंट पॉवरचे आवाहन

पावसाळ्यात काळजी घेण्याचे टोरंट पॉवरचे आवाहन लोकमानस प्रतिनिधी - पावसाळ्यात सततचा पाऊस, जोराचा वारा तसेच पाणी साचल्याच्या घटनांमुळे वीज पुरवठा करणारया केबल्स खराब होऊन शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते.  पावसामुळे किंवा जोरदार हवेने झाड किंवा त्याची फांदी वीज वाहक वाहिन्यांवर पडली तर, त्या केबल तुटू शकतात किंवा शॉट सर्किट होते. अश्या तुटलेल्या वीज केबलना तसेच वीजेच्या पोलना हात लावू नये, तसेच पावसाळ्यात पाणी भरलेल्या ठिकाणी वीजेच्या पोलना स्पर्श करू नये, असे आवाहन टोरंट पॉवरने केले आहे. अनेकदा मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. अश्या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून रोहीत्रांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात येतो. तसेच अनेकदा वीजेच्या खांबावरील वीज वाहक वाहिन्यांवर एखाद्या झाडाची फांदी पडून तेथेही वीज पुरवठा खंडीत होतो. ज्या ठिकाणी भूमिगत वीज वाहिन्या आहेत त्याठिकाणी जर केबल डॅमेज झालेली असेल तर, पावसाचे पाणी जाऊन तेथे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते, अश्या वेळी त्या परिसराचा वीज पुरवठा खंडीत करून ती केबल दुरूस्त केली जाते. अश्या अनेक प्रकारांमुळे पावसाळ्यात ग्राहकांचा वीज पुरवठा

पेटंट, ट्रेडमार्क विभागातच डिजिटल इंडियाचे वाजले तीन तेरा, सतत बंद पडतेय पेटंट, ट्रेडमार्क नोंदणीची वेबसाईट

पेटंट, ट्रेडमार्क विभागातच डिजिटल इंडियाचे वाजले तीन तेरा,  सतत बंद पडतेय पेटंट, ट्रेडमार्क नोंदणीची वेबसाईट लोकमानस प्रतिनिधी मुंबई-  डिजिटल इंडियाचा उठता-बसता जप करणा-या मोदी सरकारच्याच दिव्याखाली अंधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशोधन आणि व्यापाराच्या क्षेत्रातील शासकीय नोंदणीसाठी अत्यंत महत्वाच्या अशा पेटंट आणि ट्रेडमार्कच्या नोंदणीशी संबंधित वेबसाईट  आज दिवसभर जवळपास बंद पडल्या होत्या. त्यामुळे संबंधित व्यावसायिक आणि वकिल यांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरे जावे लागले. जून महिन्यातही या दोन्ही वेबसाईटसनी नियमित बंद पडण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.  यामुळे एकूणच मोदी सरकारच्या डिजिटल इंडियाच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. इझ ऑफ बिझिनेसचा नारा देत उद्योग क्षेत्राला मदत करण्याची भूमिका घेतल्याचे चित्र रंगविणा-या मोदी सरकारने पेटंट आणि ट्रेडमार्क्स विभागाच्या ढिसाळ कारभाराकडे मात्र साफ दुर्लक्ष करीत उद्योग क्षेत्राची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे.   जून महिन्यात सतत बंद पडली वेबसाईट भारतात सरासरी ६७ हजार पेटंट दरवर्षी नोंदले जातात. या माध्यमातून एकीकडे संशोधकांच्या शोधांना कायद

अजित पवारांसहित ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका

अजित पवारांसहित ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्ष धोरणाच्या, हिताच्या विरोधात कारवाया करत शपथ घेतली ती त्यांची कृती बेकायदेशीर असून पक्षाला अंधारात ठेवल्याने याबाबत एका सदस्याने शिस्तभंग समितीकडे तक्रार केली त्यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान त्यांचे तात्काळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना ईमेल आणि व्हॉटस्ॲपवरद्वारे आणि त्यांच्या आय मेसेजवरदेखील पाठवण्यात आले आहे. सदस्यत्व रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरात लवकर बाजू ऐकून घ्यावी अशी विनंतीही केली आहे.याशिवाय निवडणूक आयोगालाही याबाबत कळवण्यात आले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद

विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

 विधानसभेच्या  विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती मुंबई -प्रतिनिधी  राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत महायुतीच्या सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  पवार यांनी शुक्रवारीच राजीनामा दिल्याची माहिती दिली.  या घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते पदी मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार,  माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली.  पक्षाचे मुख्य प्रतोद पदी देखील आव्हाडांना संधी देण्यात आली आहे.   आव्हाड यांच्या नियुक्तीमुळे राज्याचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता ही दोन्ही महत्त्वाची पदे ठाणे जिल्ह्याला मिळाली आहेत.   आव्हाड यांनी या नियुक्तीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आपण अखेरपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार असल्याची ग्वाही दिली. पवारांनी 25 वर्षे मंत्रीपदे दिल्यानंतर त्यांना या वयात असा धोका देणे चुकीचे असल्याचे आव्हाड म्हणाले. मुख्य प्रतोद म्हणून आपण काढलेल्या व्हीपचे पक्षाच्या सर्व आमदारांना पालन करावे लागेल,  अन्यथा त्याविरोधात कारवाई केली जाईल,  असा इशारा