शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश जाधव विरोधात गुन्हा नोंदवा- सय्यद अली अश्रफ यांची मागणी
शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश जाधव विरोधात गुन्हा नोंदवा- सय्यद अली अश्रफ यांची मागणी लोकमानस प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव आपल्या राजकीय लाभासाठी वादग्रस्त वक्तव्ये करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी राज्य अल्पसंख्यक आयोगाचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अश्रफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पोलीस आयुक्त व मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. मुंब्रा मध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध आदी विविध धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. धार्मिक मुद्द्यावरुन येथे कधीही तणाव झालेला नाही. गुढी पाडव्याच्या मिरवणुकीत मुस्लिम समाज सहभागी होतो तर ईद मिलादच्या मिरवणुकीत हिंदू व इतर धर्मीय बांधव सहभागी होतात. हे मुंब्राचे वैशिष्ट्य आहे. मात्र अविनाश जाधव सारख्या प्रवृत्तीमुळे या सहकार्याला धोका निर्माण होण्