कोविड काळाचा गैरवापर करुन ठाकरे परिवाराने पैसे कमावले, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करा - किरण पावसकर यांची मागणी


महापालिकेतील कोविड घोटाळ्याचे धागेदोरे आदित्य ठाकरेंपर्यंत पोचणार,
कोविड काळाचा गैरवापर करुन ठाकरे परिवाराने पैसे कमावले, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करा - शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांची मागणी

प्रतिनिधी -मुंबई

महापालिका कोविड घोटाळ्याची चौकशीला खरे पाहता विलंब झाला आहे. पहिल्या तीन महिन्यात कारवाई व्हायला हवी होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत संयम बाळगला आहे. सध्या जी कारवाई होत आहे ती गेल्यावर्षी दाखल झालेल्या तक्रारीवर होत आहे. त्यामुळे १ जुलैचा मोर्चा व या कारवाईचा काही संबंध नाही. कोविड घोटाळ्यातील सूरज चव्हाण व इतरांच्या चौकशीचे धागेदोरे निश्चितपणे आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोचणार आहेत. चव्हाण हा आदित्यची सावली बनून होता. त्यामुळे ईडीने अधिक जलद कारवाई करावी, अन्यथा माल कुठे तरी नेऊन ठेवतील, असा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव, प्रवक्ते माजी आमदार किरण पावसकर यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे परिवार व उबाठा गटावर चढवला. सामान्यांना त्रास देण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला त्यांना माफ करुन चालणार नाही, असे ते म्हणाले.

आजच्या ईडीच्या धाडीत आदित्यचे निकटवर्तीय सुरज चव्हाणकडे ४ कोटीची रोकड मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले ही रक्कम व मालमत्ता केवळ शोरुममधील आहे,  गोडाऊन मध्ये किती मिळेल याचा अंदाज लावा, सुरजचा सुत्रधार आदित्य ठाकरेंपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. उबाठा गटाने पक्षाच्या नावारर टोळी चालवली. २४ वर्षे  महापालिका ताब्यात असताना कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळाल्याने दुसऱ्या ठिकाणी काम करण्याची वेळ आली ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार कधी करणार, असा प्रश्न किरण पावसकर यांनी उध्दव ठाकरेंना विचारला.  केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा कांगावा करण्यापूर्वी मृतदेह नेणाऱ्या बॅगेची किंमत ६७१९ रुपये कुणी व कुणासाठी ठरवली,
पुरवठा कुणी केला, पीपीई कीटची किंमत चढ्या भावाने का लावली याचे उत्तर द्यावे असे त्यांनी ठणकावले. मृतदेह नेणाऱ्या बॅगेच्या खरेदीत भ्रष्टाचार हा नीचपणाचा कळस आहे. घरी बसून बॅगेचा प्रकार काय असावा, किंमती किती असाव्यात हे ठरवले जात होते असा आरोप पावसकर यांनी केला. त्यांना का क्षमा करावी,  
खरे पाहता वेळ आल्यास लष्करी कारवाई करा हा  इतका नीच प्रकार आहे, असे पावसकर म्हणाले.
पीपीई कीट दररोज पाच हजार कीट घेतले गेले मात्र त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात नाही. रेमडेसीवीर एक इंजेक्शन हाफकिन मधून ६०० रुपयांत मिळत असताना १५६८ रुपये देऊन त्याची खरेदी केली गेली. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात केला गेला, आणि असे असूनही अन्याय झाल्याची बोंब करायची, हा उबाठा गटाचा नीचपणा आहे.
कोविड काळाचा गैरवापर करुन आदित्य व उध्दव ठाकरे यांनी पैसे काढले, त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पावसकर यांनी केली.
  वांद्रे येथे शिवसेनेच्या नावावर अड्डा सुरु करण्यात आला होता त्याद्वारे अनैतिक कामे केली जात होती व पैसे कमावले जात होते त्यामुळे आज त्यावर कारवाई झाली त्याचा नागरिकांना आनंद झाला. तेथील विभागप्रमुख अनिल परब यांच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडताना शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते मात्र आजच्या कारवाईवेळी शिवसैनिक अथवा पदाधिकारी कोणीही उपस्थित नव्हता यावर पावसकर यांनी टीका केली. उबाठाची शिवसेना संपली याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे पावसकर म्हणाले.
१ जुलै सुटीचा दिवस असताना मोर्चा काढून महापालिकेच्या वॉचमनला निवेदन देणार का असा प्रश्न त्यांनी विचारला.  माजी मंत्री असलेल्यांकडून जाणिवपूर्वक हा मुहूर्त काढला का याकडे त्यांनी लक्ष वेधले.  
मराठी माणसावर कारवाईचा भोंगा वाजवणारे पत्राचाळ घोटाळा करताना तेथे राहणारे मराठी व्यक्ती होते हे विसरले का, मराठी कुटुंबाना रस्त्यावर आणायचे त्यांच्याकडून पैसे काढायचे हे धंदे त्यांनी केले व आता त्यांना मराठी माणूस आठवत आहे, असा टोला पावसकर यांनी लगावला.
 शिंदे सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीची चौकशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली त्यावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे सरकार  राज्यात आल्यानंतर पेट्रोल डिझेल दर कमी करण्यात आले,  ते कसे करण्यात आले त्याची चौकशी करणार का, सरकार आपल्या दारी , सीएम वैद्यकीय निधी वाटप, महिलांना एसटी सवलतीच्या दरात अशा विविध लोकोपयोगी कामांची चौकशी करणार का असा सवाल उपस्थित केला.  



मुंबई मपाहालिकेतील पैसा काढणे व खाणे हा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. त्यामुळे ते सैरभेर झाले आहेत. औरंगजेब कबरीला भेट देणाऱ्या प्रकाश आंबेडकर समवेत उध्दव यांचे फोटो दादर परिसरात लागले आहेत. त्यावर मुगल सम्राटा विरोधात लढलेल्या  व मराठी साम्राज्य उभे करणाऱ्या शिवाजी महाराजांना गद्दार म्हणणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  
औरंगजेबाची तळी उचलणाऱ्यांबाबत  मराठा समाज,  संभाजी ब्रिगेड व राज्याने भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पाटण्याला जाणाऱ्या उबाठा गटाकडे नगरसेवक, आमदार, खासदार नाहीत त्यामुळे तिथे जावून ते काय करणार आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
उध्दव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला, आदित्य म्हणतो माझे वडिल गायब आहेत, तर भोंगा बोलतो माझे दोन बाप आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे व त्यांना मदत करावी असे ते म्हणाले.  
अजित पवारांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री किमान स्वतःची दाढी कुरवाळतात, तुमचे काय ते पाहा असा टोला लगावला. आदित्यला भोंग्याची शिकवणी लावली असल्याचे ते म्हणाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही