19 मार्चला राज्यभर होणार अन्नत्याग उपोषण

19 मार्चला राज्यभर होणार अन्नत्याग उपोषण 
पुणे- प्रतिनिधी
येत्या 19 मार्च रोजी महाराष्ट्रभर अन्नत्याग उपवास केला जाणार आहे, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली. सत्ताधारी क्रूरपणे, विरोधी पक्ष बेजबाबदारपणे व मीडिया गाफीलपणे शेतकरी आत्महत्यांची उपेक्षा करीत आहेत. याबद्दल किसानपुत्रांमध्ये रोष आहे, असे त्यांनी सांगितले.

21 फेब्रुवारी झालेल्या आढावा बैठकी नंतर अमर हबीब म्हणाले की, गडचिरोली पासून कोकणापर्यंतच्या प्रतिनिधींनी ते काय तयारी करीत आहेत या बाबत माहिती दिली. पुण्यात किसानपुत्र बालगंधर्व जवळ उपोषणाला बसतील त्या नंतर संध्याकाळी एसेम फौंडेशन येथे 'कोरडी शेती ओले डोळे' या पुस्तकावर आंतरभारतीच्या वतीने परिसंवाद होईल असे मयूर बागुल यांनी सांगितले. नितीन राठोड, विश्वास सूर्यवंशी,  आदी सहकार्य करणार आहेत. 

आंबाजोगाईत पत्रकार उपोषणाला बसणार आहेत असे सांगून अनिकेत डिघोळकर म्हणाले की, सुदर्शन रापतवार यांच्या मार्गदर्शना खाली संध्याकाळी वसंत मुंडे यांचे व्याख्यान असयोजित केले आहे. शैलजा बरुरे यांनी स्वाराती महाविद्यालयातील विद्यार्थी मिरवणुकीने व्याख्यान स्थळी येतील असे सांगितले. शहरातील विविध संघटना सहकार्य करीत आहेत. परतुर (जालना) च्या नवनाथ तनपुरे यांनी गावोगाव भोगा लावून 19 ला उपवास करण्याचे आवाहन करीत आहोत असे सांगितले तर ऐश्वर्या तनपुरे शेतकरी आत्महत्यांवर स्ट्रीट प्ले करणार आहे. अकोट (अकोला) येथे यंदा मोठ्या प्रमाणात उपवासाची तयारी करीत आहोत असे मुकेश टापरे यांनी सांगितले. देगलूरचे नरसिंग देशमुख, नांदेडचे प्रा डॉ विकास सुकाळे, डॉ. हरीश नातू पदयात्रेत सहभागी होतील. औरंगाबादचे भूषण पाटील यांनी 4 तारखेला बैठक बोलावली असल्याचे सांगितले. संदीप धावडे यांनी वर्ध्याच्या उपोषणाच्या तयारीची माहिती दिली. रामकिसन रुद्राक्ष, डांगे (जवळा बाजार) अनंत देशपांडे (लातूर) यांनीही मार्गदर्शन केले.

डॉ राजीव बसर्गेकर यांनी किनगाव (जळगाव) ते धुळे या मार्गावर निघणार्या पदयात्रे बद्दल माहिती दिली. हृतगंधा पाटील व संदीप धावडे यांचे वडील पदयात्रेत सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. ही पदयात्रा 12 मार्चला निघणार आहे. सुभाष कच्छवे (परभणी) या पदयात्रेची तयारी करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही