खंडाळा घाटातील अपघातात पाच जणांचा मृत्यू

 

खंडाळा घाटातील अपघातात पाच जणांचा मृत्यू

प्रतिनिधी

मुंबई- खंडाळा घाटात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनामध्ये चालकासहित जण होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. तर तीन जखमींमध्ये चालकाचा समावेश आहे.

वसीम साजिद काझी (रा.राजापूर, जि. रत्नागिरी), अब्दुल रहमान खान (३२ रा. घाटकोपर), अनिल सुनिल सानप, राहुल कुमार पांडे (३०, रा. कामोठे. नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गाडेकर (२३ म्हातारपाडा, मुंबई) यांचा या अपघातात मृत्यू झाला.  मच्छिंद्र आंबोरे (३८- चालक), अमीरउल्ला चौधरी, दिपक खैराल हे जखमी झाले आहेत. अस्फीया रईस चौधरी (२५ , कुर्ला, मुंबई) या बचावल्या आहेत.

 पुण्याहून मुंबईकडे येताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने मागून अज्ञात वाहनाला धडक दिली हा अपघात घडला. याबाबत अधिक तपास खोपोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कदम करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही