भाजपचे सरकार यावे व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हाजी अली दर्गाह मध्ये प्रार्थना, हाजी अरफात शेख यांच्याकडून तीन दिवसांपासून प्रार्थनेचे आयोजन


 

भाजपचे सरकार यावे व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हाजी अली दर्गाह मध्ये प्रार्थना,

हाजी अरफात शेख यांच्याकडून तीन दिवसांपासून प्रार्थनेचे आयोजन

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर यावे व देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मुंबईतील हाजी अली दर्गाहमध्ये विशेष दुआ करण्यात आली. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष तथा भाजपच्या वाहतूक आघाडीचे प्रमुख हाजी अरफात शेख यांच्यातर्फे या विशेष दुआचे आयोजन करण्यात आले होते.  

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात व अल्पसंख्याक समाजाचे प्रलंबित प्रश्न सुटावेत, अशी प्रार्थना हाजी अरफात शेख यांनी केली. कामगार, शेतकरी, वाहतूकदार व इतर सर्वसामान्य जनतेला सुखी समाधानी जीवन जगता यावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात येणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी हाजी अली दर्गाह मध्ये सलग तीन दिवसांपासून प्रार्थना केली जात असल्याची माहिती हाजी अरफात शेख यांनी 'लोकमानस' शी बोलताना दिली.

सलग तीन दिवसांपासून प्रार्थना केली जात आहे.

फडणवीस यांनी मुस्लिम समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर येण्यासाठी  आयोजित करण्यात आलेल्या या प्रार्थनेमध्ये मुस्लिम समाजाचे अनेक मौलाना देखील सहभागी झाल्याची माहिती शेख यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही