बारावीचा निकाल जाहीर, ९१.२५ टक्के उत्तीर्ण, कोकण विभाग प्रथम क्रमांकावर
बारावीचा निकाल जाहीर, ९१.२५ टक्के उत्तीर्ण, कोकण विभाग प्रथम क्रमांकावर
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई - राज्यातील बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ९१.२५ टक्के निकाल लागला आहे. निकालात कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल ८८.१३ टक्के लागला असून मुंबई विभागाला सगळ्यात शेवटचा क्रमांक मिळाला आहे.
मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे.
राज्यातील विभागांचे निकाल पुढीलप्रमाणे -
कोकण : 96.01 %
पुणे : 93.34 %
कोल्हापूर : 93.28 %
अमरावती : 92.75 %
औरंगाबाद : 91.85 %
नाशिक : 91.66 %
लातूर : 90.37 %
नागपूर : 90.35 %
मुंबई : 88.13 %
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा