राज्यातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठाकडे, गुरुवारी सुनावणी
राज्यातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठाकडे, गुरुवारी सुनावणी
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील याचिकेची सुनावणी गुरुवारी होईल. आज झालेल्या सुनावणीत हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरन्यायाधीश एन. वी. रमण्णा, न्या. हिमा कोहली व कृष्ण मुरारी यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय घेतला.
२५ ऑगस्ट रोजी घटनापीठाकडे या प्रकरणाशी संबंधित सर्व ५ याचिकांवर सुनावणी होईल. घटनापीठ याबाबत काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा